ACADEMY VISION :

आमची अकॅडमी – उज्ज्वल भविष्यासाठी विश्वासार्ह मार्गदर्शन! 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित असलेली आमची अकॅडमी ही केवळ शिकवण्याची जागा नसून, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे एक प्रेरणास्थान आहे. अनुभवी व तज्ञ शिक्षकवर्ग

प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल अशा सोप्या पद्धतीने अध्यापन, वैयक्तिक लक्ष आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन हे आमचे वैशिष्ट्य आहे.

 संकल्पनात्मक व गुणवत्तापूर्ण शिक्षण

फक्त पाठांतर नव्हे तर विषयाची मूळ संकल्पना समजावून देण्यावर आमचा भर असतो.

नियमित टेस्ट, सराव व प्रगतीचा आढावा

विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती सतत तपासून त्यानुसार मार्गदर्शन केले जाते.

स्पर्धा परीक्षांसाठी योग्य तयारी

शालेय अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षांची भक्कम पायाभरणी केली जाते. संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि जबाबदारीची भावना निर्माण केली जाते.

पालकांचा विश्वास – आमची खरी ओळख

विद्यार्थ्यांचे यश हेच आमचे खरे यश मानून आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. आजच आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या…

विद्यार्थ्याची सर्वतोपरी जडणघडण व्हावी याकडे प्रकर्षाने लक्ष दिले जाते.

विद्यार्थ्याची अभ्यासातील प्रगती जितकी महत्वाची तेवढीच शारीरिक क्षमता विकसित होणे गरजेचे आहे.यासाठी सिद्धिविनायक अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांना व्यायामाची सवय लावली जाते. पी. टी.,  योगासने,प्राणायाम, धावणे,

ध्यानधारणा करणे यासारख्या सवयी विद्यार्थ्यांमध्ये रुजवल्या जातात.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक क्षमता 

शारीरिक तंदुरुस्ती   व चपळता वाढते.

मानसिक एकाग्रता व आत्मविश्वास निर्माण होतो

संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात या सर्वाचा 

अभ्यासात सकारात्मक परिणाम दिसून येतो.

सिद्धिविनायक अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांना रायफल शूटिंगचे  प्रशिक्षण दिले जाते.

रायफल शूटिंग हा खेळ केवळ वर्तमानापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल

भविष्यासाठी एक भक्कम पाया घालणारा क्रीडा प्रकार आहे. 

त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण अकॅडमी मध्ये दिले जाते.

पालकांचा विश्वास हीच आमची खरी ओळख,विद्यार्थ्यांचे यश

हेच आमचे मुख्य ध्येय.

म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या.आजच्या डिजिटल युगात TV व मोबाईलचा अति-वापर मुलांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासावर परिणाम करत आहे. अशा वेळी अकॅडमी ही मुलांसाठी एक सकारात्मक, शिस्तबद्ध व सुरक्षित दिशा देणारी व्यवस्था ठरते.

 अकॅडमी का महत्त्वाची?

वेळेचा योग्य वापर: ठराविक वेळापत्रकामुळे मुलांचा स्क्रीन टाइम कमी होतो.

शारीरिक तंदुरुस्ती: खेळ, व्यायाम व मैदानी उपक्रमांमुळे आरोग्य सुधारते.

एकाग्रता व शिस्त: नियमित सरावामुळे लक्ष केंद्रित करण्याची सवय लागते.

आत्मविश्वास वाढ: स्पर्धा, प्रात्यक्षिके व यशामुळे आत्मविश्वास बळकट होतो.

सकारात्मक सवयी: मोबाईलपेक्षा कौशल्य, छंद व मेहनतीकडे ओढ वाढते.

सामाजिक कौशल्ये: टीमवर्क, नेतृत्व व संवादकौशल्य विकसित होते.

*पालकांसाठी फायदे*

मुलं सुरक्षित व मार्गदर्शित वातावरणात गुंतलेली राहतात

चुकीच्या सवयींपासून दूर राहून उज्ज्वल भविष्यासाठी तयारी होते.

म्हणूनच योग्य निर्णय घ्या आणि

सिद्धिविनायक  अकॅडमीमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *